marathistatus.co

‘जलेगी तेरे बाप की…’ डायलॉगवर लेखक मनोज मुंतशीर म्हणाले, ‘हे तर माझ्या आजींनी…’

१६ जून रोजी प्रदर्शित झालेला ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ सिनेमाला ट्रोलिंगचा आणि प्रेक्षकांच्या संतापाचा सामना करावा लागत आहे. त्याचं कारणही तसंच आहे. या सिनेमात आजच्या काळात वापरले जातात ते डायलॉग वापरले गेले आहेत. ‘कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, जलेगी भी तेरे बाप की’, ‘निकल’ असे शब्द असलेले सीन पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

त्यासोबतच सिनेमातील प्रत्येक व्यक्तीरेखासंबंधी वाद निर्माण झाला आहे. मग ते श्रीराम असुदेत नाहीतर रावण. समाजमाध्यमांवर या चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या मीम्सची लाट उसळली आहे. खराब व्हीएफक्स हा देखिल मुद्दा चर्चेत आहे. याबाबत आदिपुरुषवर होत असलेल्या टीकेवरुन सिनेमाचे दिग्दर्शक ओम राऊत आणि संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी वृत्तवाहिन्यांवर समोर येत स्पष्टीकरण दिले आहे.

तशाप्रकारचे संवाद का लिहिले या प्रश्नावर संवाद लेखक मनोज मुंतशीर म्हणाले, ‘ते संवाद मुद्दामूनच लिहिले आहेत. जर ट्रोलिंग होतच आहे तर मग ते फक्त हनुमानाच्या संवादांवरच का, श्रीराम आणि सीतेच्या संवादांवर पण आक्षेप घ्या. हनुमानाच्या संवादांना आम्ही खूप साध्या सरळ पद्धतीने मांडले आहे. सर्वच पात्रांच्या भाषेत फरक असलाच पाहिजे. रामायण ही एक कथा आहे आणि ती गावागावात वेगवेगळ्या भाषेत सांगितली जाते. मी ज्या गावातून येतो तिथे माझ्या आजींनी अशाच भाषेत रामायण सांगितले. या देशातील मोठमोठे संत, कथावाचक अशाच भाषेत बोलतात जसे हनुमानाचे ते संवाद आहेत. मी पहिलाच माणूस नाही ज्याने असे डायलॉग लिहिले आहेत, हे आधीपासूनच वापरले जात आहेत.’

तर आणखी एका मुलाखतीत मनोज मुंतशीर म्हणाले, ‘अनेक लोक सिनेमाला सुरुवातीपासूनच ट्रोल करत आहेत. हा आदिपुरुष आहे. यामध्ये आजच्या पिढीला समजेल अशा भाषेचा वापर केला आहे. आम्ही कधीच असं सांगितलं नाही की सिनेमात वाल्मिकींसारखी भाषा असेल. तसं असतं तर चित्रपट संस्कृतमध्ये बनवावा लागला असता. आणि मला संस्कृत येत नाही.’

सिनेमाला प्रचंड ट्रोल केले जात असले तरी कमाईबाबतीत सिनेमाने रेकॉर्ड तोडला आहे. 500 कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमाने पहिल्याच दिवशी 90 कोटींचा गल्ला जमवला. तर दोनच दिवसांत सिनेमाने 100 कोटी पार केले आहेत. कुतुहलापोटी प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन ‘आदीपुरुष’ पाहणे पसंत करत आहेत.

 

Trending

No posts found.

1 thought on “‘जलेगी तेरे बाप की…’ डायलॉगवर लेखक मनोज मुंतशीर म्हणाले, ‘हे तर माझ्या आजींनी…’”

  1. Pingback: आणि मोबाइल घेताच आग लागली... कधी सुधारणात आपण. ही चूक आपल्या जीवावर उठू शकते. - marathistatus.co

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *