Best Mood Status in Marathi
रस्ता बघून चल,
नाहीतर एक दिवस असा येईल,
की वाटेतले मुके दगडही,
प्रश्न विचारू लागतील.
तू दिलेल्या दुःखाने,
मला बरेच काही शिकवले,
जग हे कसे असते,
शेवटी तूच मला दाखवले.
जवळीक साधून माझ्याशी,
कशी किमया केलीस.
वेड लावून माझ्या मनाला
तू का निघून गेलीस.
हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला,
गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला.
वावटळ आठवणींचे आज मी पाहिले,
स्वप्नातील घर तुझे माझे
आज पुन्हा एकदा त्यात वाहिले.
आठवणी विसरता येतात,
पण प्रेम विसरता येत नाही.
ती मला नेहमी म्हणायची कि,
मी तुला माझं करूनच सोडेन,
आज तिने तेच केलं,
तिने मला तीच करूनच सोडलं.
माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल,
रात्रभर नाही,
पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.
कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो.
प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती.
सगळ्यांनसाठी मी आहे.
पण माझ्यासाठी कोणीच नाही ?
जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल
तर त्याला फक्त आठवणीत ठेवा,
प्रेम करू नका कारण प्रेम संपत
पण आठवणी कधीच संपत नाही..
होईलच तुला एक दिवस सये
माझ्या भोळ्या प्रेमाची जानीव,
भ्रमर कुणी जाता हात सोडून
भासेल तुला फक्त माझीच ऊनीव..
आज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत,
तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत.
नाती हि झाडाच्या पानासारखी असतात,
एकदा तुटली कि त्यांची हिरवळ
कायमची निघून जाते.
काच बनविणाऱ्याने जर हृदय पणकाचेच बनविले असत तर फार बर झालं असत,कमीत कमी तोड्ण्याराच्याहाताला जखम तरी झाली असती.
नाही आठवण काढलीस तरी चालेल,
पण विसरून मात्र जाऊ नकोस..
तू मला सोडून गेलीस
आता मी कोणालच दोष देऊ शकत नाही
कारण बघ न माझे हृदय पण
सर्वात मोठे धोकेबाज निघाले
ते पण फ़क़्त तुझ्यासाठी धडधडत आहे !
तिला जायचं होत ती गेली
मला गमवायच होत मी गमावलं,
फरक फक्त एवढाच,
तिने जीवनाचा एक क्षण गमावला
आणि मी एका क्षणात जीवन.
किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी,
पण, शेवटी ती माझ्या भावनांशीच खेळली !
मन गुंतायाला हि वेळ लागत नाही
आणि मन तुटायला हि वेळ लागत नाही
वेळ लागतो फक्त ते गुंतलेले मन आवरायला
आणि तुटलेले मन सावरायला.
शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,
पण अश्रूंना बाहेर पडण्यासाठी,
मनाला जखमी व्हावी लागते.
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे,
आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम
करतो तिच्या शेजारी बसने.
आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार
नाही याची जाणीव होणे.
तुझ्या डोळ्यात अश्रू येतील
असे मी कधीही वागणार नाही कारण
तुझ्या अश्रूची किंमत
मी कधी चुकवू शकणार नाही.
आखिर कैसे भुला दे हम उन्हें.
मौत इंसानो को आती है यादो को नहीं..
शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते,
तर अश्रुंची गरज भासली नसती
सर्व काही शब्दात सांगता आले असते
तर भावनांना किंमतच उरली नसती.
आयुष्यात वाईट तेव्हा वाटते,
जेव्हा आपण काही चुका करतो,
पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा,
त्या हजार चुका आपण
एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो.
कधी कधी काही पाऊले अशी पडतात,
की सावल्या सोबतच्या परख्या होऊ लागतात,
काही गैरसमज इतके मनाला बोचतात,
की आपल्या नकळत
सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात.
एकटेपणा तेव्हा वाटत नाही
जेव्हा आपण एकटे असतो
तर तो तेव्हा वाटतो
जेव्हा आपल्याबरोबर सर्वजणं असतात,
पण ती व्यक्ती नसते
जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते.
छापा असो वा काटा असो,
नाणे खरे असावे लागते,
प्रेम असो वा नसो,
भावना शुद्ध असाव्या लागतात,
तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी,
कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात,
पण मने मात्र कायमची तुटतात.
किती छान होतं रे आपल नात,
कोणास ठाऊक, कोणाची
नजर लागली आपल्या नात्याला,
उडून गेली ती स्वप्ने.
संपला राजा राणी चा खेळ.
मोडली आपली कहाणी अर्ध्यावर.
तुजवीण शोन्या राहिले मी अधुरी.
ज्या क्षणी तुला वाटेल कि,
हे नात तोडण्याची वेळ आली आहे
तेव्हा स्वतःच्या मनाला हे एकदा जरूर विचार कि,
हे नात एवढा काळ का जपलं..का जपलं..
मीच मुर्ख होतो जे तुला
माझ्या आयुष्यातल्या प्रवासातला
जोड़ीदार समजून बसलो,
तू चालत तर माझ्या सोबत होतीस पण
तुझे डोळे दुसऱ्याच कोणाच्या शोधात होते.
पुन्हा भेटशील अश्याच एका वळणावर
तेव्हा असेल तुला माझी आस
कळेल तुला खरं प्रेम होत माझं
नव्हता तो फक्त टाईमपास.
ह्या हृदयालाच माहिती आहे
माझ्या प्रेमाची स्थिती,
कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,
तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.
मला याच अजिबात वाईट वाटत नाही
की तू माझी नाही झालीस,
सुख तर या गोष्टीच आहे कि
कधीतरी तू माझी होतीस.
कधी आयुष्यात आलीस
अन कधी माझी सवय झाली
काही कळलेच नाही,
एक एक दिवस जात होता
अन एक एक आठवण
मनाच्या पटलावर तरंगून जात होती.
कुणाला कितीही आपण
आपलं मानलं तरीही,
शेवटी ते परकेच ठरतात.
जाऊदे तिला मला सोडून
दुसऱ्याच्या मिठी मध्ये
तसेही एवढ प्रेम करूनसुद्धा
जी माझी नाही झाली,
दुसऱ्याची तरी कशी होणार ?
आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका
एखाद्या दिवशी जागे व्हाल, तेव्हा कळेल की
तारे मोजण्याच्या नादात आपण चंद्रच गमावून बसलो.
जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा
आपण नखं कापतो बोटं नाही
त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून
नाती तुटायची वेळ येते तेव्हा
अहंकार तोडा नाती नाही.
येवढे तरी माझ्यावर उपकार करुन बघ,
माझ्या डोळ्यातील आसवांतल्या
वेदना ओळखून बघ.
नाही म्हणालीस जरी तू,
नाही दुखी होणार मी,
जगत होतो, जगत आहे,
जगतच राहणार मी.
आता निरोप घेतो दुःखी नको होऊस
तुजसमोर नाही पुन्हा येणार मी.
तुझ्या साठी बघ मी,
किती मोठ्ठं मन केलं.!
तुला आवडतं खेळायला म्हणून..
हृदयाचं खेळणं केलं..
विसरायचे म्हटलं विसरताही येत नाही,
तुझ्यावीना एक क्षण राहताही येत नाही.
जीवनात जोडलेली नाती
कधी तोडायची नसतात.
छोट्याश्या वादळानं
विश्वासाची घर मोडायची नसतात.
प्रेमाची खरी किंमत
ते दूर गेल्यावर कळते,
कितीही दुर्लक्ष केले तरी,
नजर मात्र तिथेच वळते.
जे जगतात ते प्रेम करतात
आणि जे जळतात ते लफडं
म्हणतात.
परकचं करायच होत
तर जवळ का गं घेतलस ?
विश्वासच नव्हता तर
प्रेम का गं केलस ?
जो या वेड्या मनाला बऱ्याचदा रडवतो,
तो वेडाच या मनाला खूप खूप आवडतो.
एके दिवशी माझा श्वास बंद होईल
नको विचार करूस कि माझे प्रेम कमी होईल
अंतर फक्त एवढंच असेल
आज मी तुझी आठवण काढत आहे.
उद्या माझी आठवण तुला येईल.
जेव्हा तुमची जवळची व्यक्ती
तुमच्यावर रागवायची बंद होते
तेव्हा समजून जा
तुमची त्यांच्या आयुष्यातली
महत्वाची जागा गमावलीत.
प्रेम कोणावर करायचे?
जो आपल्याला आवडतो त्याच्यावर की
ज्याला आपण आवडतो त्याच्यावर
मन वेधून घेणाऱ्या गुलाबावर की
त्याला जपणाऱ्या काट्यावर.
तुला आताच सांगून ठेवते
प्रेम म्हणजे मंत्रालयातील फाईल नाही
कि जाळली आणि मिटवलं सगळं.
कुणी तुला विसरेल तर काय करशील?
सगळ्या आठवणी मिटवेल तर काय करशील?
कुणाला सोडण्यापूर्वी एकदा विचार नक्की कर
कुणी तुला सोडले तर काय करशील ?
आवडत्या व्यक्तीला
आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा,
आवडत्या व्यक्तीसाठी
इगो सोडणं केव्हाही चांगलं.
तुमच्या ex ला दुसऱ्याबरोबर
बघून कधीच जेलस फील करू नका,
कारण आपल्या मोठ्यांनी आपल्याला
शिकवलेलं आहेच कि
आपण खेळून झालेली खेळणी
दुसऱ्या गरिबांना वाटत जा.
तू माझी होतीस तेव्हा मी तुझा होतो,
अन आता तू माझी नाहीस तरीही मी तुझाच आहे.
फरक फक्त एकच आहे
मी केलं त्याला प्रेम म्हणतात अन तू केलं त्याला सौदा.
आज स्वप्नातही अबोला
तुझा नाही सुटला ..
तुला समजावण्याच्या नादात
माझ्या अश्रूंचा बांध मात्र फुटला ..
प्रेम मी हि केलं, प्रेम तिने हि केलं
फरक फक्त एवढाच होता कि
मी प्रेम केलं तिला मिळवण्यासाठी
तिने प्रेम केलं वेळ घालवण्यासाठी.
तू आणि मी समुद्राचे दोन किनारे
कधी हि भेटू न शकणारे
पण एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे.
पाऊस आज खूप रडला
माहित नाही मला कोणावर रुसला
कदाचित त्यालाही आठवत असेल
त्याचे ओघळलेले थेंब
त्याने सुद्धा केले असेल कोणावरतरी खरे प्रेम.
आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट
चिंब चिंब भिजली होती,
तेव्हा आठवले कुशीत माझ्या
येऊन तू निजली होती.
जर तुम्हाला रिजेक्ट,
अस्वीकार केलं तर निराश होऊ नका.
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.
विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघू नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस
तिच्यापासून जी स्वतः रडून
जी तुला हसवेल.
असं समजू नकोस कि विसरलो मी तुला,
आपल्या प्रेमाला डाग लागू नये,
म्हणून दूर आहे मी,
मनात फक्त तूच आहेस.
तू कितीही रागावलीस माझ्यावर
पण मला मनातून मिटवू शकत नाहीस
राहशील कदाचित दूर माझ्यापासून,
पण स्वतःला माझ्यापासून दूर ठेवू शकत नाही.
दुष्परिणाम माहित असूनही
केलं जाणार व्यसन म्हणजे
प्रेम.
शेवटपर्यँत साथ देता येणार नसेल
तर कोणाला प्रेमात पाडू नका.
शेवटी लग्न कास्ट मध्येच आणि
घरच्यांच्या पसंतीनेच करणार असाल तर
कोणाच प्रेम प्रपोसलला होकार देउ नका.
रिलेशनशिप चा शेवट
ब्रेकअपनेच करायचा अस आधीपासून ठरवले
तर रिलेशनशीपला स्टार्टच करु नका.
कोणाच्या भावनांशी खेळू नका.
खूप प्रेम केलं होतं त्याच्यावर,
आता कुणावर करूच शकत नाही.
खूप स्वप्नं पाहिली होती त्याची,
जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत.
एखाद्याच्या Feelings बरोबर
खेळणं बरं नसतं.
इतकी नकोशी झालीय का रे मी तुला..
कि एक कॉल हि करावासा वाटत नाही,
का मला ?
मी अजूनही त्या फालतूच्या आशेवर आहे कि
एक दिवस तू परत येशील.
मला त्रास देऊन जर तुला आनंद मिळत असेल,
तर मी तो त्रास सहन करायला कधी पण तयार आहे.
चेहऱ्यावर नेहमीच हसू,
पण मनात खूप काही साठलेलं.
आले जरी डोळे भरून,
ते कोणालाही न दिसलेलं !
सोडून जायचे असेल तर
बिंदास जा पण,
लक्षात ठेव..
मागे वळून बघायची सवय
मला पण नाही.
कोणत्याही व्यक्तीला समजून
घेतल्याशिवाय पसंत करू नका..
आणि त्या पसंत केलेल्या व्यक्तीला
समजुन न घेता गमावु पण नका !
ती नेहमी म्हणायची,
जे होते ते चांगल्यासाठीच होते..
मग तिचं मला सोडून जाणे,
हे तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या ?
जगणं खूप सुंदर आहे,
त्यावर हिरमुसू नका,
एक फुल उमललं नाही,
म्हणून रोपाला तुडवू नका..
सगळं मनासारखं होतं असं नाही,
पण मनासारखं झालेलं विसरू नका,
सुटतो काही जणांचा हात नकळत,
पण धरलेले हात सोडू नका.
प्रेम कधीच चुकीचे नसते,
कदाचित निवड चुकीची असू शकते.
ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी,
फक्त तेच अपेक्षा भंग करतात.
मनापासुन प्रेम करणारेच,
फक्त आठवणीत रडतात.
तु सोडून गेलीस मला तरी,
मी वाट पाहणार.
अखेरच्या श्वासापर्यंत,
फक्त तुझा अन,
तुझाच राहणार.
ज्या व्यक्तीसोबत आपली
आयुष्यभर राहण्याची इच्छा असते,
त्या व्यक्तीपासून,
दुर जाणे खुप कठीण असते.
तुझ्यात आणि माझ्यात,
फक्त थोडाच फरक होता.
तुला वेळ घालवायचा होता,
आणि मला आयुष्य.
मी मनसोक्त रडून घेते,
घरात कुणी नसल्यावर.
मग सहज हसायला जमतं,
चारचौघात बसल्यावर.
मागितली होती फक्त तुझी साथ,
तु तर सोडून गेलीस हातातला हात,
म्हणूनच आता तुझ्याकडे
माझे काहीच मागणे नाही,
पण तुझ्याशिवाय जगणे,
म्हणजे काहीच जगणे नाही.
कोण कोणाचे नसते
हे अगोदर समजले असते,
तर हे तुटणारे नाते,
मी कुणाशी जोडलेच नसते.
वेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते..
पण एवढं लक्षात ठेव,
आज तू मला विसरलीस,
उद्या तुला कोणीतरी विसरेल !
भरू दे आकाश कितीही ढगांनी
खऱ्या प्रेमापुढे ते ढग निवतील,
लाख येऊ दे अडथळे,
तरी माझ्या प्रेमापुढे एकदा नक्कीच झुकतील.
आज माझ्याच सावलीला विचारलं मी,
का चालते तू माझ्यासोबत..
सावलीने पण हसत उत्तर दिलं,
कोण आहे दुसरं तुझ्या सोबत.
गमावलं मी पण होतं, गमावलं तिने पण होतं,
फरक फक्त एवढा आहे ?
तिला मिळविण्याकरीता मी सर्व काही गमावलं,
अन, तिने सर्व काही मिळविण्याकरीता मला गमावलं.
गळून गेलेल्या पाकळ्या
जशा पुन्हा जुळत नाही,
तसेच मनातून उतरलेले काहीजण
पुन्हा मनात भरत नाहीत !
मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं,
ही तुझी इच्छा होती आणि,
तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात,
ही माझी इच्छा होती !
कधी कधी खूप
दूर पर्यंत जावं लागतं..
हे बघण्यासाठी कि,
आपलं जवळचं कोण आहे.
रहा तु कुठेही,
पण जप मात्र स्वतःला.
आडोशाला उभे राहून,
पाहीन मी तुझ्या सुखाला.
मन गुंतायला हि वेळ लागत नाही आणि,
मन तुटायला हि वेळ लागत नाही.
वेळ लागतो फक्त,
ते गुंतलेले मन आवरायला आणि,
तुटलेले मन सावरायला.
जगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठी..
पण तुला माझ्या भावनाच आवडल्या का,
खेळण्यासाठी.
जवळची नाती ही माणसाला,
कधी कधी खूप छळतात,
जितके जास्त जपाल तितके,
आपणाला आणखी दुर लोटतात.
जेव्हा काही खास लोक
आपल्याला दुर्लक्षित करत असतील,
तेव्हा समजून जा की,
त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत.
प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी..
हिशोब उरलाय तो फक्त,
तू दिलेल्या जखमांचा.
आज मला खूप रडावसं वाटतंय,
स्वतःशी परत खूप भांडावंसं वाटतंय,
भरलेल्या डोळ्याने आरश्या समोर बसावसं वाटतंय,
अन आपलं कोणीच नाही म्हणून,
स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतंय.
तुझ्यासाठी खूप सोपे असेल मला विसरणं,
पण माझ्यासाठी खूप कठीण आहे,
तुला विसरून जगणं !
प्रेम त्याच्यावर करा,
ज्याचे ह्रदय आधीच तुटलेले आहे,
कारण ह्रदय तुटण्याचे दुःख,
त्याच्याइतके कुणालाच माहित नसते.
कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून,
बरंच काही गमवावे लागते किंमत म्हणून.
जाता जाता ती सांगून गेली,
काळजी घेत जा स्वतःची,
पण तिचे डोळे सांगत होते की,
आता माझी काळजी कोण घेणार ?
माझ्यापासून दूरच जायचंय,
तर खुशाल जा.
फक्त एवढंच लक्षात ठेव,
पुन्हा मागे वळून बघायची
मला पण सवय नाही.
तुझ्या येण्याच्या चाहुलीने
अजूनही तिथेच उभा राहतो,
जिथे ब्रेकअप करून तुझ्या जाण्याने
अजूनही तिथेच तुझी वाट पाहतो.
तुझ्या अशा फसवणुकीने,
मन घाबरते पुन्हा प्रेम करण्यास,
ओळखीच्या माणसाशी देखील,
आता तयार नसते बोलण्यास.
जीवनात प्रेम एकदाच करायचे असते,
मन कधी कोणाचे मोडायचे नसते,
ज्याने केला भरवसा,
त्याच्या भावनांशी कधी खेळायचे नसते.
ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो,
तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा,
कारण नाते तोडणे सोपे आहे,
पण ते पुन्हा जोडणे खूप अवघड आहे.
तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती
परत येत असती तर.
ती व्यक्ती तुम्हाला
एकटे सोडूनच का गेली असती.
कितीही जगले कोणासाठी,
कोणीच कोणासाठी मरत नाही,
अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला,
पण नशीबाचे चक्र थांबत नाही,
आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर,
त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही.
तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार,
दोन्ही माझ्याच पक्षात येईल,
जर तू माझ्याशी प्रेम करशील तर,
मी तुझ्या हृदयात असेल,
अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर,
मी तुझ्या मनात असेल.
थांब इथून पुढे मला एकट्यालाच जायचंय,
पण धन्यवाद !
तू इथवर आलीस,
सारे आयुष्य नसलीस तरी,
चार पाऊले माझी झालीस.
इतकी वर्षे झाली आता तरी स्वप्नात येऊ नकोस,
दूर आपण झालो कधीचे, प्लीज़…
आठवणींत भेटू नकोस.
झालंय ब्रेकअप तरीही,
डोळ्यांना वाट पाहायला लावू नकोस.
खरेच सांगू का तुला,
माझ्या मनात तू आता राहू नकोस.
नेहमीच आनंद मिळेल असे नाही,
कधी कधी दुःख पण सोसावे लागते,
कितीही अहंकारी असाल तरीही,
प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते.
तिच्या डोळ्यात पाहिले तेव्हा समजले,
प्रेम कशाला म्हणतात,
आणि सोडून गेली तेव्हा समजले,
खरे प्रेम कशाला म्हणतात.
माणसाचे आयुष्य जीवनात दोन वेळा नक्की बदलते,
कुणीतरी खास व्यक्तीने जीवनात प्रवेश केल्यावर,
आणि कुणीतरी खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यावर.
माहिती आहे तुझ्या नजरेत मला,
काहीच किंमत नाही.
पण माझी किंमत त्यांना विचार,
ज्यांना मी वळून सुद्धा पाहत नाही.
एखाद्याला सोडून जातांना,
मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये,
जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा,
जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं.
काही लोक इतके नशीबवान असतात की,
दुसऱ्यांना दुखावून ही,
नेहमीच त्यांना परत खुप प्रेम मिळते,
आणि काहीजण इतके कमनशीबी असतात की,
दुसऱ्यांना इतके भरभरुन प्रेम देऊनही,
मोबदल्यात त्यांना दुःख आणि धोकाच मिळतो.
ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली,
तुझ्यासारखे खूप भेटतील मला,
मी पण हसून तिला विचारलं,
आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला.
खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात,
कितीही मनापासून प्रेम करा,
तुझ्याशिवाय जगु शकत नाही,
असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात.
तुला जायचे होते तु गेलीस,
मला गमवायचे होते मी गमावले,
फरक फक्त एवढाच आहे की,
तु आयुष्यातला एक क्षण गमावला,
आणि मी एका क्षणात पूर्ण आयुष्य गमावले.
नशिबात आणि हृदयात फक्त एवढाच फरक असतो,
जो हृदयात असतो तो नशिबात नसतो
आणि जो नशिबात असतो तो हृदयात नसतो.
मी तुला मिळवत असतांना,
तु मला कुठेतरी गमावत होतीस,
मी तुझ्या नजरेत भरतांना मात्र,
तु माझ्या नजरेतून उतरत होतीस.
कुठेही रहा पण सुखात रहा,
सुख माझे त्यात आहे,
स्वतःचा जीव जपत रहा,
कारण जीव माझा तुझ्यात आहे.
प्रेमात एकदा खाल्ला धोका,
आता प्रेमात पडायची इच्छाच नाही,
Aआता जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचंय,
आता परत रडायची इच्छाच नाही.
जगाची रीतच न्यारी आहे
इथे सगळ्यांना आपली प्रितच प्यारी आहे
मी म्हणत नाही शेवटपर्यंत साथ दे,
पण शक्य आहे तोपर्यंत
तरी माझा हातात हात घे.
कोणाची आठवण येणं कठीण नाही
कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणे
असे मोजकेच असतात तेच आयुष्यभर साथ देतात.
आता मी तुझ्या जीवनातला महत्वाचा व्यक्ती नाही
पण मी आशा व्यक्त करतो कि,
एके दिवशी जेव्हा मी तुझ्या जीवनात नसेल
तेव्हा माझी आठवण आल्यावर तू हळूच
हसशील आणि म्हणशील
नक्कीच तो इतरांपेक्षा चांगला होता.
कधी कोणाच्या डोळ्यामध्ये
पाणी येऊ देऊ नये
हसवता नाही आलं तरी
अश्रूंचं कारण होऊ नये.
मी अजूनही तुझी वाट पाहतोय.
आठवणीत नाही ठेवलस तरी चालेलं
पण..? विसरायचा प्रयत्न करु नको,
तुझ्यासाठी जग सोडायची तयारी आहे माझी
पण…? तु दुसऱ्यासाठी मला सोडु नको.
तिला वाटत मी तिला आता विसरलो ही असेल
पण तिला का नाही कळत
वेळ बदलते, काळ बदलतो
पण पाहिलं प्रेम कधीच नाही विसरू शकत.