Magel Tyala Saur Krushi Pump Yojna 2025
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना २०२४ राबविण्याबाबत महाराष्ट्र शासन, उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग मार्फत दिनांक 25 जुलै 2024 रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे.
योजनेचे नाव | मागेल त्याला सौर कृषी पंप योजना 2024 |
अंतर्गत | मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 |
योजनेचा कालावधी | एप्रिल 2024 ते मार्च 2029 |
लाभार्थी | शेतकरी |
लाभ | जमिनीच्या क्षेत्रफळानुसार 3 Hp, 5Hp, 7.5 Hp पंप |
लाभार्थी हिस्सा – सर्वसाधारण शेतकरी | 10 टक्के |
लाभार्थी हिस्सा – अनुसूचित जाती – जमातींचे शेतकरी | 05 टक्के |
प्रस्तावना –
महाराष्ट्र राज्यात मार्च 2024 अखेर 47.41 लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत. सदर ग्राहकांना महावितरण कंपनी मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो. एकूण ग्राहकांपैकी 16 टक्के कृषी पंप ग्राहक असून उर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे 30 टक्के उर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो. कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर 39 हरज 246 दशलक्ष युनिट आहे. प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो. सद्यस्थितीत मा. महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना रात्रीच्या काळात 10/8 तास किंवा दिवसा 8 तास थ्री फेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते.
जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषित व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आह. राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. त्याकरिता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवशयक आहे. सदर परिस्थिती लक्षात घेवून राज्य शासनाने राज्यातील 7.5 एच.पी. पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवले आहे.
2. मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांनी दिनांक 28 जून 2024 रोजी पावसाळी अधिवेशन 2024 मधील अर्थसंकल्पीय भाषण मुद्दा क्रमांक 100 अन्वये खालीलप्रमाणे घोषणा केली आहे.
“भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे, त्याची आपल्याला जाणीव आहे. मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी भांधावाना मदतीच्या हाताची गरज आहे. त्यासाठी त्यांना दिलासा देणारी “मुख्यमंत्री बळीराजा बीज योजना” मी आता घोषित करित आहे. याद्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीजबिलाच भर उचलण्याचे शासनाचे ठरविले असून राज्यातील 44 लाख 3 हजार शेतकऱ्याच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपाम्पणा पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल. याकरिता 14 हजार 760 कोटी रुपये अनुदान स्वरुपात उपलब्ध करून देनाय्त येणार आहे.
त्यानुसार राज्यातील महावितरण कामापनीच्या कृषी ग्राहकांना मदत करणाच्या दृष्टीने व त्यांची थकबाकी वाढू न देण्याच्या उद्देशाने मुखमंत्री बळीराजा मोफत वीज योजना – 2024 राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय –
- भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे. मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. अशा अडचणीत आलेल्या राज्यातील 7.5 एच. पी. पर्यंतच्या शेती पंप गरहाकाना एप्रिल 2024 पासून मोफत वीज देण्यासाठी “मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना – 2024” राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.
- योजनेचा कालावधी – सदर योजना 5 वर्षासाठी एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत राबविण्यास मान्यता देनाय्त येत आहे. मात्र 3 वर्षाच्या कालावधीनन्तर सदर योजनेचा आढावा घेवून पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
- पात्रता – राज्यातील 7.5 एच पी. पर्यंत शेतीपंपांचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील.
- योजनेच्या अंमलबजावणीची पद्धती – एप्रिल 2024 पासून 7.5 एच. पी पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे. शासनास विद्यत अधिनियम २००3, कलम 65 अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा घरक वर्गवारीला अनुदान देवून त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यास आलेलं आहेत. त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीजदर सवलती पोटी रक्कम सह्सानाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरुपात वर्ग करणायत येईल. सध्या देनाय्त येणारी वीजदर सवलत रु. ,6985 कोटी अधिक वीजबिल माफिनुसार सवलत रुपये 7,775 कोटी असे वार्षिक वीजदर सवलती पोटी प्रतिवर्षी रु. 14,760 कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील. या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्याल त्याप्रमाणे महावितरण कामापाणीस शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल.
योजनेची ठळक वैशिष्टे
- शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना
- सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ 10 टक्के रक्कम भरून सौर Panels व कृषी पंपाचा पूर्ण संच
- अनुसूचित जाती – जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा 5 टक्के
- उर्वरित रक्कम केंद्रआणि राज्य सरकारकडून अनुदान
- जमिनीच्या क्षेत्रानुसार 3 ते 7.5 एचपी चे पंप
- पाच वर्षाची दुरुस्ती हमी, इंसुरंस सह
- वीजबिल नाही, लोद्शेदिन्ग्ची चिंता नाही
- सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा
लाभार्थी निवडीचे निकष
- 2.5 एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचे सौर कृषिपंप, 2.51 ते 5 एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा आणि 5 एकरावरील शेतजमीन धारक शेतकऱ्यास 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा शूर कृषिपंप देय राहील. तसेच पत्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या साहूर कृशिपामापाचे मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील.
- वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहीर, बोअरवेल यांचे मालकी तसेच बारमाही वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारील शेतजमीनधाक शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील.
- ज्या शेतकऱ्यांकडे बोअरवेल, विहीर व नदी ई. ठिकाणी शास्वत पाण्याचा स्रोत आहे याची खाती महावितार्ण्द्वारे करण्यात येईल. तथापि, जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत.
- अटल सौर कृषी पंप योजना – 1, अटल सौर कृषी पंप योजना – 2 व मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानाअंतर्गत लाभास पत्र असतील
महत्वाच्या लिंक | |
Official Website | Click Here |
योजनेची Home Page | Click Here |
योजनेची माहिती | Click Here |
परिपत्रक, शासन निर्णय Page | Click Here |
शासन निर्णय | Download |
Apply Online | Click Here |
अर्जाची सद्यस्थिती | Click Here |
Online Payment करा | Click Here |
तुमच्या प्रश्नाची उत्तरे मिळवा | Click Here |
आणखी योजना बघा | Click Here |
WhatsApp Join करा | Click Here |
शासकीय योनानाची निरंतर माहिती – Click Here
Salient Features of the Scheme
- Independent and sustainable scheme for farmers to facilitate for irrigation
- Solar panels and complete set of agricultural pumps will get by paying only 10% amount to General category farmers.
- Beneficiary share for Scheduled Caste and Scheduled Tribes farmers is 5%
- The remaining amount is subsidized by the Central and State Governments
- Pumps ranging from 3 to 7.5 HP capacity depending on area of the land
- Five year repair guarantee, including insurance
- No electricity bill, no concern of load shedding
- Day time power supply for irrigation
Beneficiary Selection Criteria
- Solar agricultural pumps of up to 3 HP capacity will be eligible to the farmer holding agricultural land up to 2.5 acres, 5 HP capacity to the farmer holding agricultural land from 2.51 to 5 acres and solar agricultural pump of 7.5 HP capacity to the farmer holding agricultural land above 5 acres. Also, if farmers demand solar agricultural pumps of less than the eligible capacity, it will be permissible.
- Owners of individual or community farm pond, wells, borewells and farmers holding agricultural land adjacent to perennial rivers/streams will also be eligible for this scheme.
- MSEDCL will ensure that farmers who have assured water sources in borewell, well, river etc. However, these pumps can’t be use to draw water from water reservoirs of water conservation works.
- Beneficiary farmers who have not availed benfits of Atal Saur Krushi Pump Yojana-1, Atal Saur Krushi Pump Yojana -2 and Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana will also be eligible for benefits under this campaign.
Contact No. – 9321675647