marathistatus.co

Lineman Day – प्रथमच साजरा होत आहे लाईनमन दिवस

Lineman Day वीज कामगारांचा होत आहे पहिल्यांदाच सन्मान

०४ मार्च रोजी लाईनमन डे

केंद्र शासनाने दिनांक ०४ मार्च २०२३ रोजी देशभरात लाईनमन दिवस साजरा करणेबाबत सर्व सार्वजनिक आणि  खाजगी विद्युत क्षेत्रातील आस्थापनांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार आज देशभरात आणि आपल्या महाराष्ट्रात सुद्धा लाईनमन दिवस मोठ्या उत्सहात साजरा केल्या जात आहे.

सार्वजनिक आणि  खाजगी विद्युत क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक लाईनमन ला लाईनमन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

          तुमच्या आमच्या दैनंदिन जीवनात ज्या विजेचा संबध येतो, ज्याच्या शिवाय वेळोवेळी आपण प्रत्येक कामात अडू शकतो, ती वीज आपल्यापर्यंत पोहचवण्याचे काम महावितरणचे लाईनमन करीत असतात. पण वीज गेल्याशिवाय आपल्याला विजेचे महत्व कळत नाही. आणि तसेच ती वीज पोहचवण्याकरिता अहोरात्र झटणाऱ्या वीज कर्मचाऱ्याचे सुद्धा महत्व कळत नाही.  कारण इतर विभागातील कर्मचारी तुम्हाहाला समोरासमोर दिसतात. जसे की एस. टी. मध्ये प्रवास करताना चालक आणि वाहक आपल्याला प्रत्यक्ष दिसतात, पोस्टाने  आलेले पत्र तुम्ही पोस्टमन च्या हाताने घेता अशी बरीच उदाहरणे देता येईल पण. अदृश्य अशी वीज तुमच्या घरापर्यंत पोहचवण्याचे काम जो वीज कर्मचारी करतो तो आणि त्याचे काम नेहमी उपेक्षितच राहिला आहे.

          मुंबईमधील काही भाग वगळता संपूर्ण महारष्ट्रात अखंडित पणे वीज सेवा देण्याकरिता महावितरण चे जनमित्र अहोरात्र झटत असतात.आज महावितारांची ग्राहक संख्या ०२ कोटी ९२ लाख च्या वर असून, महाराष्ट्रात विजेचे जाळे ११ लाख किलोमीटर पेक्षा जास्त झालेले आहे. महाराष्ट्रात एकूण ४०९४ उपकेंद्रांमधून महाराष्ट्र राज्याला २५ हजार Megawatt वीज पोहोचवण्याचे काम अखंड पणे महावितरण तर्फे केल्या जात आहे. हा महावितरण चा संपूर्ण डोलारा अविरतपणे आणि कोणत्याही प्रकारचा खंड न पडू देता ८१ हजार ७०९ कर्मचारी करित आहे. यामधून जवळपास ८० टक्के कर्मचारी हे थेट पणे विजेच्या कामाशी संबधित आहेत.  आजतयागत या अत्यंत जोखमीच्या कामात अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले तर अनेक जणांना अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आले.

          कोविड सारख्या महामारीच्या काळात, जेव्हा आपण जीवाच्या भीतीने आणि शासनाच्या आदेशाने घराच्या बाहेर पडणे बंद केले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रचंड उकाडा सहन व्हावा, घरातच टीव्ही, मोबाईल च्या माध्यमातून आपले मनोरंजन व्हावे, एकंदरीतच तुमचे आमचे घरातील जीवन सुसह्य व्हावे याकरिता……

          त्याचबरोबर करोडो लोकांचे जीव वाचविण्याकरिता झटत असलेली आरोग्य यंत्रणा योग्य काम करावी याकरिता, विजेवर अवलंबून असलेली प्रत्येक गोष्ट, दवाखाने, पेट्रोलपंप, ऑक्सिजन प्लांट, औषधीचे प्लांट, मास्क बनविण्याचे कारखाने, अश्या एक न अनेक गोष्टी सुरळीत पणे चालाव्या याकरिता  स्वतःच्या आणि घराच्यांच्याही जीवाची पर्वा न करता प्रत्यक्ष  फिल्ड उतरून अविरतपणे वीज सेवा देण्याचे काम या लाईनमन ने केले.

          आणखी एक उदाहरण द्यायचे झाल्यास ०२ जून २०२० रोजी निसर्ग चक्री वादळ महाराष्ट्राच्या कोंकण किनारपट्टीवर धडकले. आणि त्याने होत्याचे नव्हते केले. या निसर्ग चक्री वादळाने कोकणातील पेन, अलिबाग, रोहा, श्रीवर्धन या आणि अनेक भागातील घरेच्या घरे उडवून नेले, शेकडो वर्षे अभिमानाने उभी असलेली विशाल वृक्ष जमीनदोस्त केली, त्याचबरोबर महावितरणने मेहनतीने उभे केलेले विजेचे जाळे सुद्धा विस्कळीत केले, विस्कळीत केले हा शब्द खूपच छोटा होईल त्यापेक्षा या निसर्ग चक्री वादळाने जसे एखादा माणूस एखादी जुनी दुष्मनी काढण्याकरिता डोक्यावर मानसिक आघात झाल्यावर समोरच्याचे किंवा किंवा छोटा मुलगा रागात आल्यावर खेळण्यांची आणि घरातील साहित्याचे जमेल तसे नुकसान करतो, तोडफोड करतो, मारामारी करतो त्याचप्रमणे महावितरण चे शेकडो खांब खाली पाडले, विजेचे तार जमिनीवर लोळायला लागेल, तारांवर झाले पडली, तारा तुटून जमिनीवर पडल्या, ट्रान्सफोर्मर फेल झालीत. असे खूपच नुकसान झाले. आणि हा संपूर्ण भाग अंधारात गेला. ते पूर्ववत करणे हे शासनासमोर, महावितरण समोर मोठे आव्हान होते. 

          तोच वरच्या पातळीवर हालचाली झाल्यात, रात्रीच वीज कर्मचाऱ्यांकरिता आणि अधिकाऱ्यानकरिता पत्र पडले कि उद्या सकाळी सकाळी अति तत्काळ सेवा देण्याकरिता कोकणात निघायचे आहे. कोरोनाच्या महामारीचा काळ, घरात छोटे मुळे, गरोदर, पत्नी, वृध्द आईवडील, शेजारी शेजाऱ्याला विचारात नाही, “आम्ही काळजी म्हणून घरातच असतो पण शेजारचा वीज कर्मचारी फिल्ड वर बाहेर जातो” म्हणून आम्हालाही कोरोणाचा धोका होऊ शकतो म्हणून आधीच वीज कर्मचारी आणि त्यांच्या परिवारातील सदस्यासोबत आधीच चार हात लांब असणारे लोक.  पण वरिष्ठांचा आदेश त्याहीपेक्षा राज्याप्रती, देशाप्रती आणि या मायबाप जनतेप्रती आपले असलेले कर्तव्य याची जाणीव म्हणून हा वीज कर्मचारी स्वतःचा जीव, कुटुंबातील सदस्याच्या जीव यापेक्षाही कर्तव्याला महत्व देवून, कसलेही कारण न दाखवता दोन जोडी कपडे आणि टेस्टर, पकड, स्क्रू ड्रायवर घेवून काल रात्री whats app वर मिळालेल्या पत्राचा मन ठेवून पत्नी, मुळे, वृद्ध आई वडील यांचा निरोप घेवून निघाला एका लढाईवर. अंधारमय झालेल्या भागाला प्रकाशमान करायला.

          कोकणात पोहचल्यावर राहण्याची, सकाळच्या नाश्त्याची, रात्रीच्या जेवणाची महावितरणाने उत्तम सोय केली पण अनेक ठिकाणी दुपारचे जेवण प्रत्येक फिल्ड वा पोहचवणे शक्य नसल्याकारणाने हा कर्मचारी मेहनतीचे काम करून, खाली चिखल तुडवून, तर वर पोल वर लाईन ओढून,  ज्या गावात आहे त्या गावातील लोकांनी जे प्रेमाने जेवण दिले तेच शेतात, मैदानात, झाडाखाली जिथे मिळेल तिथे जेवण करून कोणतीही तक्रार न करता कामाला लागायचा आणि रात्री उशिरापर्यंत काम करून उद्याच्या कामाचे आजच नियोजन करून प्रचंड अंग मेहनत करून थकलेले शरीर घेवून रात्री झोपी जायचा. अश्याप्रकारे दहा दिवसात घरी परत येतो असे सांगून निघालेले अनेक कर्मचारी तब्बत महिनाभर वीज सुरळीत करण्याचे काम करत होते. 

आणि रेकॉर्ड ब्रेक वेळेत संपूर्ण विस्कळीत झालेले विजेचे झाले Restore केले.

अश्या या लाईनमन च्या कामाचे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या कुटुंबियांचे कौतुक झालेच पाहिजे.

प्रथमच साजरा करण्यात येत असलेल्या या लाईनमन दिनाच्या औचित्य साधून आमच्या मार्फत सदर लेख प्रपंच प्रस्तुत करीत आहोत. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुमच्या आमच्या साठी काम करणाऱ्या लाईनमन च्या कामाला प्रतिष्ठा प्राप्त होईल अशी आशा करतो.

 

डॉ. प्रदिप सदाशिव निंदेकर 

वरिष्ठ तंत्रज्ञ, मुलुंड

९३२६०३०८६0 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *