परीषद भरली कळ्यांची,
प्रश्न होता, काय उमेद (आशा),
फुल बनून जगण्याची,
पहीली बोलली गुलाब कळी
मी फुल बनल्यावर प्रियकराच्या हातून, प्रेयसीच्या हाताल जाईल
दोन जिवाचे काळीज एका बंधनात जोडून देईन ,
दुसरा नंबर होता,
चमेलीच्या कळीचा
फुलल्यानंतर वेगळं,
जीवन जगण्याच्या,
नव्या नवरीच्या केसामध्ये,
गजरा होवुन सजण्याचा,
तिची पहीली रात,
सुंगधात रंगवण्याचा,
हसुन बोलली सदाफुली,
मी फुल बनल्यानंतर,
सर्व प्रथम देवाच्या,
मंदीरात जाईन ,
शोभा वाढवून देवाच्या पायाची,
आयुष्य संपेपर्यंत तेथेच राहीन,
शेवटी झेंडूची कळी बोलली,
अश्रू आणून डोई रडली,
सर्वांनी फक्त जीवंताना सजविले,
मी मरणाऱ्यांना (प्रेतांना) श्रद्धांजली वाहीन,
सुखा सुखात सगळे,
साथ देतात,
मी दुःखात साथ देईल…….
(आनन्न वानखडे)
(बी.ए. भाग ३)