महिलांच्या आतरिक गुणांचा विकास | करील ऐसे शिक्षण खास |
जरी दिले जाईल त्यास | तरीच भावी जग पालटे ||
भारतात महिलेने शिकणे गृहीत मानले जात नव्हते. बालसंगोपन, गृह व्यवस्थापन आणि पाक कौशल्याचे शिक्षण घ्यायला हवेत, जेणेकरून महिला उत्तम पत्नी, सुमाता आणि आदर्श गृहिणी होऊ शकतील. कारण शेवटी महिलांना चूल आणि मुलं सांभाळायचे आहे. अशी धोरण बांधण्यात आले होते. परंतु महिलांनी शिक्षण घेतले पाहिजे याकरिता प्रामुख्याने गोपाळराव जोशी, ज्योतिराव फुले, न्यायमूर्ती रानडे यांची नावे घ्यावीशी वाटतात. त्यांच्यामुळेच आज प्रत्येक महिला ही हक्काने न्यायाने आणि अभिमानाने शिक्षण घेऊ शकते. शिक्षण म्हणजे साक्षरता व्यक्तिमत्व विकास घडवण्याची सुवर्णसंधी, व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचे महत्त्वाचे साधन, डोळसपणे समाजात वावरण्याची एक अनोळखी जबाबदारी विचारांमधील चांगले वाईट बदल म्हणजे शिक्षण प्रणाली शिक्षणाचा कोणी अनुभव घ्यावा किंवा कोणी नाही हे कुठेही मांडलेले नाही. महिला शिक्षित असणे म्हणजे आपली स्वतःची ओळख निर्माण करून देणे, तिचे विचार स्वप्न व्यक्तिमत्व यावर महिला स्वतःला सिद्ध करू शकते.
महिलांच्या शिक्षणाचे महत्त्व ज्योतिबा फुलेंनी दीडशे वर्षांपूर्वी ओळखले होते. सन 1848 मध्ये पहिली मुलींची शाळा त्यांनी व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली. शिक्षण हे ना वयापुरते मर्यादित आहे. ना महिला व पुरुष या लिंगभेद भावपूरते. शिक्षणामुळे महिला साक्षर आणि सुज्ञ झालेल्या आहे. पूर्वीच्या काळापासून जो एक पायंडा रोवला गेला होता की, महिलांनी घर सांभाळावे आणि पुरुषाने बाहेरील काम करून घर चालवावे. परंतु हा पायाला महिलांच्या चळवळीमुळे मोडीत काढण्यात आलेला आहे. महिला शिक्षणामुळे त्यांना विचारण्याची संधी मिळू लागली समाजातील घडामोडी करिता शिक्षण असणे तेवढेच महत्त्वाचे ठरू लागले.
भारतात 1975 नंतर महिला संघटनांच्या कृतिशील चळवळींना प्रारंभ झाला. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये अनेकांना महिला शिक्षण का महत्वाचे असायला हवे असा प्रश्न पडत असावा! पण घरातील पुरुषाला शिक्षणाची संधी मिळाली तर कुटुंबाला त्याचा फक्त आर्थिक लाभ होतो मात्र त्याच कुटुंबातील जर महिलांच शिकलेली नसेल, तिला लिहिता वाचता येत नसेल तर त्या कुटुंबाचे नुकसान होईल ना. जर त्या कुटुंबातील महिला शिक्षित असेल तर त्या कुटुंबाचा फायदा होईल. असे म्हणतात की, घरातील महिला शिक्षित असेल तर अख्ख कुटुंब शिक्षित होते, हे खरेच आहे. म्हणून महिलांनी शिक्षण घ्यायला हवे. भारतातील शिक्षित महिला ही नव्या काळाची नितांत गरज आहे महिला साक्षरच झाली नाही तर विकसित देशाची अपेक्षा सत्यात उतरू शकत नाही.
आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपला नावाचा ठसा उमटवला आहे. महिला ही कुटुंबाचा केंद्रबिंदू आहे. घरची लक्ष्मी म्हणून तिचा स्वीकार केला जातो. महिलाही फक्त चूल आणि मूल या संकल्पनेवर आधारित व्यक्तिमत्व नसून ती साक्षरतेची प्रतिमा बंदी आहे. मुलगी शिकली प्रगती झाली हे बोधवाक्य नेहमी वाचण्यात येते, म्हणून शिक्षण हे महिला उद्धाराचे व समाज परिवर्तनाचे साधन आहे.
महिला ही एक मुलगी, बहीण, पत्नी, आई, सून आणि सासू अशा आयुष्यात बराच पत्राची भूमिका बजावत असते. कोणत्याही नात्यात सामील होण्यापूर्वी प्रथम ती स्वतंत्र देशाची नागरिक असून तिच्याकडे मनुष्यासारखे सर्व हक्क प्रदान केलेले आहे. जीवन प्रवासातील सर्व क्षेत्रांमध्ये अधिक चांगले कार्य आणि कामगिरी मिळविण्यासाठी योग्य शिक्षण मिळाविण्याचे अधिकार आहेत. महिला शिक्षणामुळे त्यांच्या आयुष्यात अधिक सक्षम आणि कणखर बनले आहेत. शिक्षित असल्यामुळे महिला त्यांच्या कर्तव्य आणि हक्कांबद्दल जागरूक असतात. तसेच पुरुषाप्रमाणे देशाच्या विकासासाठी हातभार लावण्यासाठी, जबाबदारी घेण्यासाठी महिला मदत करतात.
आजच्या इंटरनेटच्या युगात तर अनेक महिला घरी बसून सर्व खरेदी, मुलांचे शिक्षण तसेच घरगुती व्यवहार करायला शिकल्या आहेत. हे सगळे शक्य झाले शिक्षणामुळे, महिला एकावेळी घरातील कामे, मुलांकडे लक्ष देणे, घर सांभाळणे एक उत्तम अशी जबाबदारी पेलणे आणि त्यात ती स्वतःला काय हवे, काय नको त्याच्याकडे पण लक्ष देते. अशी अनेक कामे एका वेळेस एक महिला करत असते. आज संपूर्ण जगात महिलांनी विविध क्षेत्रात आपली कामगिरी बजावली आहे. जेव्हा अनेक क्षेत्रात महिला नाव काढतात तेव्हा प्रत्येक महिलांना व पुरुषांना याचा अभिमान वाटतो. त्यांच्याबद्दल नाव घेताना आदर वाटतो मग तितकाच आदर आपल्या घरातील महिलांन करिता ते जेव्हा व्यक्त करतील तेव्हा प्रत्येक घरातील महिलाही अभिमानाने आणि आत्मसन्मानाने जीवन जगेल आणि खऱ्या अर्थाने तो तिच्यासाठी मोलाचा दागिना राहील. आणि हा सन्मान जेव्हा तिला मिळेल ज्या दिवशी ज्या घरात कन्यारत्न जन्म घेईल त्या कुटुंबातील सदस्य म्हणतील मुलगी झाली लक्ष्मी आली.
तुम्हालाही तुमची गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. लगेच क्लिक करा
Shubhangi Tule
MSW (CD), MA ( Soci),
MA ( RTM Thought),
MPhil (SW), Jarnalizam
Mob – 9822732569