
खूप कमी लोक आपल्या आयुष्यात
सुख आणि आशीवार्द घेऊन येतात,
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू
अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.

फुलपाखरू फक्त १४ दिवस जगतं
परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने
जगून कित्येक हृदय जिंकत.
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत रहा.

जितकी प्रसिद्धी मिळवाल
तितकेच शत्रू निर्माण कराल
कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी
जळणारे जास्त निर्माण होतील.
क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर
पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.

ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय,
तोच नेहमी इतरांना हसवू शकतो,
कारण हसण्याची किंमत
त्याच्याइतकी कोणालाच ठाऊक नसते.

समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही
जहाजाला बुडवू शकत नाही,
पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं
तर ते जहाज बुडल्याशिवाय रहात नाही,
तसंच जगातले सगळे नकारात्मक विचारतुम्हाला हरवू शकत नाहीत,
जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही.
काहीच हाती लागत नाही
तेव्हा मिळतो तो अनुभव.

दगडाने डोकेही फुटतात,
पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली
तर लोक त्यावर डोकं टेकतात.

जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर,
तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका,
त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता
असा त्याचा अर्थ आहे.

जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपूर
माहित असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली
तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही.

आपले दुःख मोजक्या १ टक्का माणसांजवळच व्यक्त करा,
कारण ५० टक्के लोकांना काही पर्वा नसते,
आणि ४९ टक्के लोकांना,
तुम्ही अडचणीत आहेत याचा आनंदचं होतो.

तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण,
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.


