
कोणत्याही माणसाला अडचणीत जपा
तो तुम्हाला आयुष्यभर जपेल.

ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

जितकी प्रसिद्धी मिळवाल,
तितकेच शत्रू निर्माण कराल,
कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी
जळणारे जास्त निर्माण होतील.

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा
कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.
तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर
तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर
थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा
आणि पुढे चालत रहा.

हल्ली चांगल्या कामाला
मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.

चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा
योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले.

संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही,
पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं,
तर ते जहाज बुडल्याशिवाय रहात नाही,
तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत,
जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही.

लखलखते तारे पाहण्यासाठी
आपल्याला अंधारातच राहवं लागतं.

तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण,
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.

शुन्यालाही देता येते किंमत,
फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा.

समुद्रात किती लाटा आहेत
हे महत्वाचा नसून.
त्या किणा-याला किती स्पर्श
करतात ते महत्वाचं असत.


